व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तिसऱ्या आघाडीची सत्ता आल्यास जरांगे मुख्यमंत्री : राजरत्न आंबेडकर

0

हिंगोली click2ashti राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे तसेच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची सत्ता आली आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असतील अशी घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केली.
महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे. या आघाडी बाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मनोज जरांगे असतील अशी माहिती दिली आहे. ते आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील महायुतीला सरकारविराेधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राजरात्न आंबेडकर यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.